Showing posts with label महाराष्ट्र टाईम्स अग्रलेख. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र टाईम्स अग्रलेख. Show all posts

संमेलनांचे वारे!

Monday, 21 May 2012

आपण स्वभावत:च उत्सवप्रेमी आहोत आणि विविध प्रकारची संमेलने मराठी समाजासाठी सांस्कृतिक उत्सवासारखीच असतात. त्यातही साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यांना आपण आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या मध्यभागी फार पूर्वीच आणून ठेवले आहे. त्यांचे स्थान अजूनही तेथून फारसे सरकलेले नाही. त्यामुळेच या संमेलनांविषयी चर्चा सुरू झाली, त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वाद झडू लागले की कला-साहित्यप्रेमींच्या अंगी उत्साहाचे वारे संचारते.

एका अर्थाने ही आपल्या सांस्कृतिकतेची, रसिकतेची खूणच मानायला हवी. त्यामुळे आता साहित्य महामंडळाच्या व नाट्य परिषदेच्या अध्यक्षांनी आगामी साहित्य व नाट्य संमेलनांची स्थळे घोषित करताच बुद्धिवादी-कलावादी मराठी मनाला कसे ताजेतवाने वाटून गेले आहे. नियोजित ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे घेतले जाणार आहे; तर मराठी नाटय संमेलन बारामती येथे भरविण्याचे निश्चित झाले आहे.

साहित्य संमेलनासाठी कराड व यवतमाळ येथूनही निमंत्रणे आली होती. त्यातही यशवंतराव चव्हाण यांचे हे जन्म-शताब्दी वर्ष असल्याने कराड येथे संमेलन घेण्यासाठी विशेष दबाव असणार. परंतु तो डावलून व यशवंतरावांची स्मृती येत्या संमेलनात जागविली जाईलच, असे सांगून साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी चिपळूणला पसंती दिली हे विशेष आहे. १९९० साली कोकणात रत्नागिरी येथे मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर कोकणच्या वाट्याला संमेलन आले नाही. कदाचित, कर्णिकांनीच पुढाकार घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली व साहित्य महा-मंडळालाच आव्हान दिले, याचाही तो परिणाम असावा.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयास पुढील वर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्यही तेथे संमेलन भरविण्यामागे आहे. २००६ सालच्या पुरामध्ये या ग्रंथालयातील ४० हजार पुस्तके वाहून गेली होती; परंतु त्याने न खचता गंथालय-चालकांनी पुन्हा त्याची उभारणी केली, ते भरभराटीस आणले. त्या जिद्दीचाही हा सन्मान होणार आहे. परंतु साहित्य महामंडळाने कराडला नकार देताना दाखवलेली दृष्टी नाट्य परिषदेला दाखवता आलेली नाही. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या गावात नाट्य संमेलन भरविण्याचा दबाववजा आग्रह परिषदेने मान्य केला आहे.

अर्थात पवार यांच्यापेक्षाही त्यांच्या पक्षातील नेत्यांचाच हा आग्रह असणार. तरीही पवार यांची कलासक्तता लक्षात घेता, त्यात वावगे काही नाही. परंतु गेली काही वर्षे नाट्य संमेलने ही राजकीय नेत्यांनी आपापल्या कर्मभूमीत करून दाखवायचा 'इव्हेण्ट' झाली आहेत. कणकवलीतील संमेलन नारायण राणेंचे, नांदेडमधील संमेलन अशोक चव्हाणांचे, सोलापुरातील सुशीलकुमार शिंदेंचे व सांगलीतील संमेलन पतंगराव कदमांचे होते. हीच परंपरा पुढे सुरू राहणार असे दिसते. राजकारण्यांनी संमेलनांचे यजमानपद घेऊ नये, असे नाही. परंतु त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होऊ नये आणि संमेलनाचे उद्घाटन सोहळे हे शक्तीप्रदर्शनाचे स्थळ होऊ नये. मात्र बहुतेकवेळा तसेच होताना दिसते व संमेलनाचा मूळ हेतू बाजूला राहतो. खरेतर साहित्य संमेलन व नाट्य संमेलन यांचे आताचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. गतवर्षी सांगली नाट्य संमेलनाच्या आयोजनात बदलाची चुणूक दिसली. परंतु या संमेलनांनी अधिक संवादी, रसिकसन्मुख होण्याची गरज आहे. नाट्य संमेलनानंतर असे वातावरण निर्माण व्हायला हवे, जेणेकरून स्थानिक सांस्कृतिक पर्यावरण ढवळून निघून तेथे नाट्यचळवळ चैतन्य-शील व्हावी. साहित्य संमेलनात साहित्यिक व रसिक यांचा एकमेळा व्हावा, नवे कसदार लेखक व त्यांचे साहित्य जोमाने पुढे यावे आणि गंथव्यवहारात नवी घुसळण व्हावी.

अलीकडे साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये जमा केले जातात. त्यातील बरेच पैसे उरतातही. पुणे साहित्य संमेलनानंतर ८२ लाख, तर ठाणे संमेलना-नंतर ९९ लाख रुपयांचा निधी उरला. तो ज्या साहित्यसंस्थांना दिला गेला, त्यांनी त्याचा काय विनियोग केला हे रसिकांना कळणे गरजेचे आहे. यापुढेही ज्यांना असा निधी मिळेल, त्यांनी वर्षभर साहित्यविषयक विविध उपक्रम करायला हवेत. संमेलनांची गरज संपलेली नाही; मात्र त्यातून साहित्य-नाट्यसंस्कृतीला चालना मिळायला हवी.
Continue Reading | comments

संमेलनांचे वारे!

आपण स्वभावत:च उत्सवप्रेमी आहोत आणि विविध प्रकारची संमेलने मराठी समाजासाठी सांस्कृतिक उत्सवासारखीच असतात. त्यातही साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यांना आपण आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या मध्यभागी फार पूर्वीच आणून ठेवले आहे. त्यांचे स्थान अजूनही तेथून फारसे सरकलेले नाही. त्यामुळेच या संमेलनांविषयी चर्चा सुरू झाली, त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वाद झडू लागले की कला-साहित्यप्रेमींच्या अंगी उत्साहाचे वारे संचारते.

एका अर्थाने ही आपल्या सांस्कृतिकतेची, रसिकतेची खूणच मानायला हवी. त्यामुळे आता साहित्य महामंडळाच्या व नाट्य परिषदेच्या अध्यक्षांनी आगामी साहित्य व नाट्य संमेलनांची स्थळे घोषित करताच बुद्धिवादी-कलावादी मराठी मनाला कसे ताजेतवाने वाटून गेले आहे. नियोजित ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे घेतले जाणार आहे; तर मराठी नाटय संमेलन बारामती येथे भरविण्याचे निश्चित झाले आहे.

साहित्य संमेलनासाठी कराड व यवतमाळ येथूनही निमंत्रणे आली होती. त्यातही यशवंतराव चव्हाण यांचे हे जन्म-शताब्दी वर्ष असल्याने कराड येथे संमेलन घेण्यासाठी विशेष दबाव असणार. परंतु तो डावलून व यशवंतरावांची स्मृती येत्या संमेलनात जागविली जाईलच, असे सांगून साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी चिपळूणला पसंती दिली हे विशेष आहे. १९९० साली कोकणात रत्नागिरी येथे मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर कोकणच्या वाट्याला संमेलन आले नाही. कदाचित, कर्णिकांनीच पुढाकार घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली व साहित्य महा-मंडळालाच आव्हान दिले, याचाही तो परिणाम असावा.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयास पुढील वर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्यही तेथे संमेलन भरविण्यामागे आहे. २००६ सालच्या पुरामध्ये या ग्रंथालयातील ४० हजार पुस्तके वाहून गेली होती; परंतु त्याने न खचता गंथालय-चालकांनी पुन्हा त्याची उभारणी केली, ते भरभराटीस आणले. त्या जिद्दीचाही हा सन्मान होणार आहे. परंतु साहित्य महामंडळाने कराडला नकार देताना दाखवलेली दृष्टी नाट्य परिषदेला दाखवता आलेली नाही. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या गावात नाट्य संमेलन भरविण्याचा दबाववजा आग्रह परिषदेने मान्य केला आहे.

अर्थात पवार यांच्यापेक्षाही त्यांच्या पक्षातील नेत्यांचाच हा आग्रह असणार. तरीही पवार यांची कलासक्तता लक्षात घेता, त्यात वावगे काही नाही. परंतु गेली काही वर्षे नाट्य संमेलने ही राजकीय नेत्यांनी आपापल्या कर्मभूमीत करून दाखवायचा 'इव्हेण्ट' झाली आहेत. कणकवलीतील संमेलन नारायण राणेंचे, नांदेडमधील संमेलन अशोक चव्हाणांचे, सोलापुरातील सुशीलकुमार शिंदेंचे व सांगलीतील संमेलन पतंगराव कदमांचे होते. हीच परंपरा पुढे सुरू राहणार असे दिसते. राजकारण्यांनी संमेलनांचे यजमानपद घेऊ नये, असे नाही. परंतु त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होऊ नये आणि संमेलनाचे उद्घाटन सोहळे हे शक्तीप्रदर्शनाचे स्थळ होऊ नये. मात्र बहुतेकवेळा तसेच होताना दिसते व संमेलनाचा मूळ हेतू बाजूला राहतो. खरेतर साहित्य संमेलन व नाट्य संमेलन यांचे आताचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. गतवर्षी सांगली नाट्य संमेलनाच्या आयोजनात बदलाची चुणूक दिसली. परंतु या संमेलनांनी अधिक संवादी, रसिकसन्मुख होण्याची गरज आहे. नाट्य संमेलनानंतर असे वातावरण निर्माण व्हायला हवे, जेणेकरून स्थानिक सांस्कृतिक पर्यावरण ढवळून निघून तेथे नाट्यचळवळ चैतन्य-शील व्हावी. साहित्य संमेलनात साहित्यिक व रसिक यांचा एकमेळा व्हावा, नवे कसदार लेखक व त्यांचे साहित्य जोमाने पुढे यावे आणि गंथव्यवहारात नवी घुसळण व्हावी.

अलीकडे साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये जमा केले जातात. त्यातील बरेच पैसे उरतातही. पुणे साहित्य संमेलनानंतर ८२ लाख, तर ठाणे संमेलना-नंतर ९९ लाख रुपयांचा निधी उरला. तो ज्या साहित्यसंस्थांना दिला गेला, त्यांनी त्याचा काय विनियोग केला हे रसिकांना कळणे गरजेचे आहे. यापुढेही ज्यांना असा निधी मिळेल, त्यांनी वर्षभर साहित्यविषयक विविध उपक्रम करायला हवेत. संमेलनांची गरज संपलेली नाही; मात्र त्यातून साहित्य-नाट्यसंस्कृतीला चालना मिळायला हवी.
Continue Reading | comments

अभयारण्यातील भयकंप!

Sunday, 20 May 2012

व्याघ्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या विदर्भाच्या भूमीत सध्या वाघांना ठार करण्याचे मनसुबे यशस्वी होत आहेत. देशातील वाघांच्या घटत्या संख्येबाबत व्यक्त होणारी चिंता नवी नाही. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील वाघांचे मृत्यूही नवे नाहीत. परवा झालेल्या वाघाच्या शिकारीची पद्धत मात्र नवी आणि निर्दयीही आहे. पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाचे उभे-आडवे १० काप बघून वनकर्मचारी हादरले आहेत.

विदर्भातील विपुल वनसंपत्ती हा आज फक्त अभिमानाचा विषय राहिलेला नाही. फोफावणाऱ्या नक्षलवादाच्या कितीतरी जखमा जंगलात दडल्या आहेत. प्राण्यांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या टोळ्या ही याच जंगलाची अलीकडे पुढे येणारी काळी बाजू आहे. परवाची वाघाची शिकार विजेचा शॉक देऊन केली, असा संशय आहे. वाघाचे शिर व हात-पाय पळवून नेताना चोरट्यांनी या वाघाला चिरून काढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाघाचे मोल माहीत असलेल्यांकडून असे होणे शक्य नाही. अभयारण्यात भुरट्या चोरांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या बातम्यांना बळ देणारी ही परिस्थिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गेल्या २० दिवसांत झालेली वाघाची ही दुसरी शिकार आहे. या परिसराने सहा महिन्यांत सात वाघांचा मृत्यू अनुभवला आहे. याआधी झालेल्या वाघाच्या शिकारीचा तपास करण्यासाठी आलेल्या सत्यशोधक समितीवर आता नव्या शिकारींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कडेकोट बंदोबस्ताचा दावा करणाऱ्या यंत्रणेपेक्षाही चोरट्यांची नजर भेदक असल्याची प्रचीती या निष्ठुर शिकारीने दिली आहे.

भारतात दिवसाला एका वाघाची तस्करी होते, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वनविभागाने हा दावा खोडला असला, तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातील तस्करी थांबलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. औषधसामग्रीसाठीच वाघांच्या अवयवांची तस्करी होते असेही नाही. वेगवेगळ्या अंधश्रद्धांनीही या तस्करीला मोठा हातभार लावला आहे. मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा व्याघ्रप्रकल्पातून बरीच 'कमाई' केल्यानंतर आता शिकारी टोळ्यांनी महाराष्ट्रा-तील जंगलांकडे मोर्चा वळविला आहे. संशयाची सुई मध्य प्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यां-कडे वळत असली, तरी नवखे चोरटेही जंगलप्रदेशात सक्रिय आहेत. जंगलात पाण्याचा अभाव असल्यामुळे वाघांना संरक्षित क्षेत्राबाहेर पडावे लागते. शिकाऱ्यांकडे वाघाचाही मार्ग बदलविण्याचे कसब असते. वाघांचे मृत्यू त्यातूनच वाढले आहेत. अनेक संघटनांनी जंगलात पाणी पुरविण्याचे काम हाती घेतले आहे; पण वाघाला जाळ्यात अडकविण्या-साठी नवे जलसाठे उभे करण्याचे कारस्थानही जंगलाआड सुरू असते. जंगलात मुरणाऱ्या या पाण्याचे स्त्रोत शोधणे खरंच कठीण आहे काय? या प्रश्नाचे उतर अनेक सत्यशोधन समित्यांनाही मिळालेले नाही.

नागपूरला 'वाघपूर' म्हणून घोषित करण्याची मागणी अलीकडे वाढते आहे. व्याघ्रप्रकल्पांचे महाद्वार म्हणून नागपूरला महत्त्व द्यावे, अशा आशयाचे फलकही उपराजधानीने मिरवून घेतले आहेत. वाघदर्शनाची हमी देऊन पर्यटकांचा ओघ ताडोबा, मेळघाट, पेंचकडे वळविला जातो. पर्यटन प्रोत्साहनाच्या नावाखाली आनंदोत्सवही साजरा होतो. पण शहरातील उमाळा आणि जंगलातील वेदना यांचा मेळ कोण घालणार? खरेतर, वनसंरक्षणासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा ताळेबंद मागण्याची ही वेळ आहे. आज देशातील १७ राज्यांमध्ये ४१ व्याघ्र-प्रकल्प आहेत. त्यात १७०६ वाघ आहेत. गेल्या सहा महिन्यांत देशभरात ३२ वाघांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ, वाघांविषयी कणव दाटून येत असतानाच वाघमृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. मुख्य म्हणजे, ३२पैकी १५ वाघांची शिकार झाली आहे. वाघांचे अपमृत्यू महाराष्ट्रासाठी अधिक चटका लावणारे आहेत. भुरटे म्हटले तरी खाणार, आणि तस्कर म्हटले तरी खाणार अशा कचाट्यात वाघोबाच आता अडकले आहेत. राज्यातील चार टायगर प्रोजेक्टपैकी तीन विदर्भात आहेत. विदर्भातील संरक्षित क्षेत्राबाहेर किमान १०० वाघांचा वावर आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा वाढता वावर प्राणिमित्रांच्या चिंतेतही भर घालणारा आहे. एकंदरित, अभयारण्यातील भयकंप अधिकाधिक गडद होत असल्याचे वास्तव ताडोबातील शिकारीने उघड केले आहे. तस्करांच्या भीतीने 'डरकाळी' थिजून जाऊ नये, यासाठी वनखात्यानेच आता वाघाची हिंमत दाखवायला हवी

Source 
Continue Reading | comments

अभयारण्यातील भयकंप!

व्याघ्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या विदर्भाच्या भूमीत सध्या वाघांना ठार करण्याचे मनसुबे यशस्वी होत आहेत. देशातील वाघांच्या घटत्या संख्येबाबत व्यक्त होणारी चिंता नवी नाही. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील वाघांचे मृत्यूही नवे नाहीत. परवा झालेल्या वाघाच्या शिकारीची पद्धत मात्र नवी आणि निर्दयीही आहे. पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाचे उभे-आडवे १० काप बघून वनकर्मचारी हादरले आहेत.

विदर्भातील विपुल वनसंपत्ती हा आज फक्त अभिमानाचा विषय राहिलेला नाही. फोफावणाऱ्या नक्षलवादाच्या कितीतरी जखमा जंगलात दडल्या आहेत. प्राण्यांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या टोळ्या ही याच जंगलाची अलीकडे पुढे येणारी काळी बाजू आहे. परवाची वाघाची शिकार विजेचा शॉक देऊन केली, असा संशय आहे. वाघाचे शिर व हात-पाय पळवून नेताना चोरट्यांनी या वाघाला चिरून काढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाघाचे मोल माहीत असलेल्यांकडून असे होणे शक्य नाही. अभयारण्यात भुरट्या चोरांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या बातम्यांना बळ देणारी ही परिस्थिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गेल्या २० दिवसांत झालेली वाघाची ही दुसरी शिकार आहे. या परिसराने सहा महिन्यांत सात वाघांचा मृत्यू अनुभवला आहे. याआधी झालेल्या वाघाच्या शिकारीचा तपास करण्यासाठी आलेल्या सत्यशोधक समितीवर आता नव्या शिकारींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कडेकोट बंदोबस्ताचा दावा करणाऱ्या यंत्रणेपेक्षाही चोरट्यांची नजर भेदक असल्याची प्रचीती या निष्ठुर शिकारीने दिली आहे.

भारतात दिवसाला एका वाघाची तस्करी होते, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वनविभागाने हा दावा खोडला असला, तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातील तस्करी थांबलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. औषधसामग्रीसाठीच वाघांच्या अवयवांची तस्करी होते असेही नाही. वेगवेगळ्या अंधश्रद्धांनीही या तस्करीला मोठा हातभार लावला आहे. मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा व्याघ्रप्रकल्पातून बरीच 'कमाई' केल्यानंतर आता शिकारी टोळ्यांनी महाराष्ट्रा-तील जंगलांकडे मोर्चा वळविला आहे. संशयाची सुई मध्य प्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यां-कडे वळत असली, तरी नवखे चोरटेही जंगलप्रदेशात सक्रिय आहेत. जंगलात पाण्याचा अभाव असल्यामुळे वाघांना संरक्षित क्षेत्राबाहेर पडावे लागते. शिकाऱ्यांकडे वाघाचाही मार्ग बदलविण्याचे कसब असते. वाघांचे मृत्यू त्यातूनच वाढले आहेत. अनेक संघटनांनी जंगलात पाणी पुरविण्याचे काम हाती घेतले आहे; पण वाघाला जाळ्यात अडकविण्या-साठी नवे जलसाठे उभे करण्याचे कारस्थानही जंगलाआड सुरू असते. जंगलात मुरणाऱ्या या पाण्याचे स्त्रोत शोधणे खरंच कठीण आहे काय? या प्रश्नाचे उतर अनेक सत्यशोधन समित्यांनाही मिळालेले नाही.

नागपूरला 'वाघपूर' म्हणून घोषित करण्याची मागणी अलीकडे वाढते आहे. व्याघ्रप्रकल्पांचे महाद्वार म्हणून नागपूरला महत्त्व द्यावे, अशा आशयाचे फलकही उपराजधानीने मिरवून घेतले आहेत. वाघदर्शनाची हमी देऊन पर्यटकांचा ओघ ताडोबा, मेळघाट, पेंचकडे वळविला जातो. पर्यटन प्रोत्साहनाच्या नावाखाली आनंदोत्सवही साजरा होतो. पण शहरातील उमाळा आणि जंगलातील वेदना यांचा मेळ कोण घालणार? खरेतर, वनसंरक्षणासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा ताळेबंद मागण्याची ही वेळ आहे. आज देशातील १७ राज्यांमध्ये ४१ व्याघ्र-प्रकल्प आहेत. त्यात १७०६ वाघ आहेत. गेल्या सहा महिन्यांत देशभरात ३२ वाघांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ, वाघांविषयी कणव दाटून येत असतानाच वाघमृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. मुख्य म्हणजे, ३२पैकी १५ वाघांची शिकार झाली आहे. वाघांचे अपमृत्यू महाराष्ट्रासाठी अधिक चटका लावणारे आहेत. भुरटे म्हटले तरी खाणार, आणि तस्कर म्हटले तरी खाणार अशा कचाट्यात वाघोबाच आता अडकले आहेत. राज्यातील चार टायगर प्रोजेक्टपैकी तीन विदर्भात आहेत. विदर्भातील संरक्षित क्षेत्राबाहेर किमान १०० वाघांचा वावर आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा वाढता वावर प्राणिमित्रांच्या चिंतेतही भर घालणारा आहे. एकंदरित, अभयारण्यातील भयकंप अधिकाधिक गडद होत असल्याचे वास्तव ताडोबातील शिकारीने उघड केले आहे. तस्करांच्या भीतीने 'डरकाळी' थिजून जाऊ नये, यासाठी वनखात्यानेच आता वाघाची हिंमत दाखवायला हवी

Source 
Continue Reading | comments

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger