सिंधुदुर्गातील गावोगावचे जलस्रोत संकटात

Friday, 25 May 2012

गाळ ठरतोय डोकेदुखी : दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाणीप्रश्‍न आणखी बिकट कळणे : ग्रामीण भागात शेती-बागायती व पिण्याच्या पाण्याचा पारंपरिक स्रोत असलेले ओढे-नद्या गाळाने भरत आहेत. त्यामुळे बारमाही जिवंत असलेले पाण्याचे स्रोत उन्हाळ्यात कोरडेठाक पडत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना व सिंचनासाठी उपसा सिंचन पद्धतीच्या प्रसारामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक स्रोतांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्‍नाला पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्षही कारणीभूत आहे. त्यामुळे स्रोतांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्‍न आणखी बिकट होण्याचा धोका आहे. नद्यांमधील गाळ काढण्याची कोट्यवधींची कंत्राटे काढून पैसे उकळण्याची संधी निर्माण करणाऱ्या शासन-प्रशासनाने या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सिंधुदुर्गच्या पूर्वेला दक्षिणोत्तर सह्याद्रीची पर्वत रांग आहे, तर पश्‍चिमेला अरबी समुद्रकिनारा आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचनाही पूर्वेकडून पश्‍चिमेकडे उताराची आहे. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याच्या भागाला "खलाटी' व सह्याद्रीच्या पायथ्याच्या परिसराला "वलाटी' असे संबोधले जाते. जिल्ह्यातील बहुतांश नद्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उगम पावतात. "सखला धावे पाणी' या तत्त्वानुसार या नद्यांचे पाणी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने म्हणजे खलाटीकडे वाहत येते. जिल्ह्यातील नद्या या उगमस्थानाकडे आकारमानाने लहान आहेत. "सह्याद्री'मुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नद्यांव्यतिरिक्तही लहान-मोठे ओढे "सह्याद्री'तून वाहतात. हे ओढे गावा-गावांतून वाहत येत समुद्राच्या जवळ आल्यावर एकमेकांना मिळून त्याचे मोठ्या नदीत रूपांतर होते. त्यानंतर या नद्या खाड्यांना जाऊन मिळतात.

जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सह्याद्रीच्या रांगेमधून उगम पावणारे नद्या-ओढे हे बारमाही स्वरूपाच्या होत्या. या पारंपरिक जलस्रोतांच्या आधारेच जिल्ह्यातील बहुतांश शेती-बागायती तग धरून होती. शिवाय पिण्याचा पाण्याचाही स्रोत होता. गेल्या काही वर्षांत मात्र निसर्गतःच उपलब्ध असलेले पारंपरिक स्रोत दुर्लक्षित झाले आहेत. पाणी उपसा करण्यासाठी कृत्रिम स्रोतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे नैसर्गिक स्रोतांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

अनेक नद्या व ओढे गाळाने भरले आहेत. त्यामुळे त्यांचे पात्र अरुंद व उथळ बनले आहे. गाळामुळे त्यातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पाण्याचे बारमाही झरे गाळामुळे नष्ट झाले आहेत. या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाल्याने कुणाचेच नद्या-ओढ्यांच्या या बदलणाऱ्या परिस्थितीकडे फारसे लक्ष नाही.

तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने नद्या व ओढ्यातून डोंगर उतारावरचा गाळ वाहून येतो. उन्हाळ्यातील शेती-बागायतीला पाणी मिळविण्यासाठी गावांत नदी-ओढ्यांवर मातीचे बंधारे घातले जात असत; मात्र गाळ पात्रात साचणार नाही, अशा पद्धतीने बंधारे घातले जात असत. त्यामुळे बंधाऱ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असे. शिवाय भूगर्भातील पाणी पातळीही वाढत असे. एकाच ओढ्यावर अनेक ठिकाणी बंधारे बांधले जात असत. पाण्यासाठी ओढ्यावरतीच अवलंबून राहावे लागत असल्याने ओढ्याच्या अस्तित्वाचीही काळजी वाहिली जात असे. आता हेच ओढे गाळाने भरून त्याचे बारमाही स्वरूप बदलून ते हंगामी झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत होणारी प्रचंड वृक्षतोड ओढे-नद्यांच्या मुळावर येत आहे. जळण व फर्निचरसाठी तसेच फळबागायतींच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीमुळे डोंगर उतारांची धूप होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून ओढे-नद्यांमध्ये साचत आहे. शिवाय विविध कारणांमुळे जमिनीचे उत्खनन करण्याच्या प्रकारमुळे मातीचे वहन होऊन नद्या-ओढे मातीने भरत आहेत. या भरण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने ओढे आता नावापुरतेच उरल्याचे चित्र आहे.
शेती-बागायतीसाठी नद्या व ओढ्यांमधून पाण्याचा बेसुमार उपसा करण्यातही वाढ झाली आहे. अशा उपशावर कोणतेही निर्बंध नाहीत किंवा त्याबाबतचे शास्त्रीय नियोजनही नसल्याचे दिसते. त्याचाही परिणाम ओढ्यांवर होत आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेसाठी नद्या-ओढे यांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. स्रोतांचे स्वरूप बदलत असले, तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यातही त्यांचे महत्त्व अधिक आहे.

नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी नव्या पिढीत जागृती हवी
शासनाच्या विविध योजनांमुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ-पाणी योजना आल्याने प्रत्येकाच्या दारात पाणी आले. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याने विहिरी, विंधण विहिरींची सुविधा खासगीरीत्या व शासकीय स्तरावरून सार्वजनिकरीत्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे या नैसर्गिक स्रोतांवरचे अवलंबित्व संपले. परिणामी नव्या पिढीला या नैसर्गिक स्रोतांचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

गाळ काढण्याचा कृती कार्यक्रम हवा
पाणीप्रश्‍न निर्माण होण्यासाठी नद्या-ओढ्यांतील गाळ कारणीभूत आहे. पाण्याचे हे नैसर्गिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावर कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. पूर नियंत्रणासाठी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केला जातो; मात्र पाण्याच्या प्रश्‍नाला कारणीभूत ठरणाऱ्या ओढ्यांच्या मृतावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.

जलसंधारणाऐवजी निधी संधारणच अधिक
जलसंधारण कार्यक्रमांतर्गत दर वर्षी कोट्यवधींचा निधी खर्चून मातीचे व दगडी बंधारे बांधण्यात येतात; मात्र जलसंधारणापेक्षा निधीचेच संधारण करण्यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक रस असल्याचे दिसते. पारंपरिक जलस्रोतांचा अभ्यास न करता दर वर्षी बंधारे बांधले जात आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी वाया जात आहे.  
पराग गावकर ः सकाळ वृत्तसेवा
Continue Reading | comments

सिंधुदुर्ग किल्ला

Thursday, 24 May 2012

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.

मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.

इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महारांजी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रूंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरूज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरूज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडीमार करण्यासाठी या बुरूजांचा उपयोग केला जात असे. आजही या बुरूजांवर जुन्या तोफा पहायला मिळतात. पुढे इ. स. १८१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.

किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.
Continue Reading | comments

HSC Result 2012

Continue Reading | comments

Welcome to Sindhudurg

The Land of Culture and Natural beauty. Sindhudurg is famous for its natural beauty like Beaches, Backwater, Waterfalls and Pilgrimage centers. The major attraction here is the long and narrow stretch of beaches. On a clear day, you can see the sea-bed through a depth of 20 ft. Then of course, there are the forts, Sindhudurg one of Maharashtra's more popular and important sea forts built in the 17th century and the famous Padmagarh fort. The name of the fort is given to the Sindhudurg district. Tourist from all over the world visit through out the year to see this Maratha glory.
Sindhudurg is in the Kokan area of Maharastra having picturesque stretch of land on the west cost of India, endowed with the beautiful seashore, picturesque Mountains and scenic natural beauty and known for tropical fruits like the world famous Alphonso mangoes, cashews, Jamuns etc.
Continue Reading | comments

Ganjifa Cards

Handmade playing cards of Sawantwadi remembers everyone about bygone era. These cards are made from circular pieces of paper on which intricate designs of Dashwar (Ten incarnations of Lord Vishnu) are hand pointed. Each and pack contains 120 hand pointed cards housed in equally colouful box.
History says that these cards arrived in Sawantwadi 350 years ago, when Bhosle, the royal family of Goa settled here after fleeing from Portuguese regieme there.  The Bhosle brought several artists along with them who were versed in wood varving and pointings. These families survived mainly by supplying handicraft items to the royal families.  In 1981 there were 45 such families though six such families still live in Sawantwadi today.
Continue Reading | comments

Wooden craft

Wooden toys of Chitrali: Speciality of Sawantwadi is wooden toys and Handicraft articles. They are manual and famous everywhere in the word. There is a demand from all parts of India and abroad. There is no doubt that this toys and handcraft article and excellent in quality but now it is difficult to make them and the hardwork craftsmen have to take to make them can be understood by visiting the place.  
Chitrali is in Sawantwadi city so it’s easy to visit tourist have to visit this place. Sawantwadi is one of the proud heritage town of India which hold distinction of preserving it’s own rich tradition and handicraft. Sawantwadi specializes in wooden craft, its wooden toys, bamboo craft, pottery art, traditional art paintings and world famous carved Bison Horns. Handmade playing cards of Sawantwadi remember everyone about by gone area. These cards are made from circular pieces of paper on which intricate designs of Dashavtar (ten incarnations of lord Vishnu) are hand-painted. Each card pack contains 120 hand painted cards housed in an equally colourful box. History says that these cards arrived in Sawantwadi 350 years ago, when Bhosle, royal family of Goa settled hear after fleeing from Portuguese regime there. The Bhosle brought several artisians along with them who were versed in wood carving and paintings. These families survived mainly by supplying handicrafts items to the royal families. In 1961 there where 45 such families though six such families still live in Sawantwadi today.
 
Continue Reading | comments

Raghunath Market

 Very famouns Raghunath Market is yet another speciality of Sawantwadi. It boasts long tradition of 150 years.  Old Raghunath market has transformed into the state of the art Handicraft's centre today. Wand of modernization has made it a one stop for all Konkani attractions from handicrafts to food items. This exhibition cum shop will allure visitors with silver and bronze wares, jewellery; Khadi clothes, Kolhapuri Chappals, Konkani food like Konkam Sharabat, Agul, Awala Juice etc.
Continue Reading | comments

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger